न्याय !
जर आपला अंत होणारच आहे तर –
खय्याम म्हणतो,
नको दु:ख व्यर्थ, आनंदात रहा !
जमले तर अन्यायात न्याय प्रस्थापित कर !
हे जग नश्वर आहे,
तसेच समज आणि हो मोकळा !
हे वास्तव आहे आणि सगळ्यांना ते माहीत असते पण स्विकारायला फार अवघड ! याचे कारण या अधिच्या रुबायात लिहीलेले सापळे. पण एक लक्षात घेतले पाहिजे, हे सगळ्याचे अस्तित्व आपण आहोत म्हणून आहे. अन्यायात न्याय प्रस्थापित कर हा सल्ला फार महत्वाचा आहे.
जयंत कुलकर्णी.



