दैववाद !
खय्याम म्हणतो,
खूष रहा ! तुझे बक्षीस त्यांनी ठरविले आहे कालच !
ईच्छा आकांक्षा मागे तुझा भूतकाळच.
सुखात रहा, कारण तुझा आग्रह नसताना,
त्यानी उद्या काय करणार आहेस हे ठरवले आहे, कालच !
हे एकदा मान्य केले की मी तुम्हाला खरंच सांगतो बरेच प्रश्न मार्गी लागतात. मुख्य म्हणजे आपल्या डोक्याला ताप होत नाही. याचा अर्थ निष्क्रीय रहायचे असे नाही.
आपल्या इच्छा, आकांक्षामागे आपला भुतकाळच असतो हे किती खरे आहे ! मागे वळून बघूनच आपण पुढे काय करायचे ते ठरवत असतो.
दैववादी म्हणजे हेच का ?
जयंत कुलकर्णी



